Saturday, July 27, 2019

माझी पहिली कविता आणि मी..!! (भाग १)




      जेंव्हा मी माझ्या पहिल्या लिहिलेल्या कवितेचा विचार करतो,  मन आपसूकच मला त्या क्षणावर घेऊन जातं जेंव्हा कविता लिहिणे म्हणजे माझं फक्त मी पाहत असलेलं स्वप्नच होतं.
        तो दिवसही तसा साधाच होता, रोजच्यासारखाच.
मि आपला शाळेकडे निघालो पण मला माहित नव्हतं कि शाळा सुटली कि घराकड एकटाच जात असताना जे कविता लिहिण्याचे विचार माझ्या मनात घोळत असत ती कविता आज मी लिहिणार आहे!
      मी शाळेत पोहोचलो आणि पहिला तास मराठीचाच होता तोही माझा एकदम आवडता. मग बाकावर बसून मी आपला मला कविता कधी लिहिता येईल का याच विचारात हरवलेला होतो. एव्हाना तर माझं स्वप्नच हे होत की कधी का होईना पण एखादी कविता लिहायचीच.

               मी माझ्या विचारात हरवलो होतो तितक्यात माझे सर वर्गात आले त्यांचं नाव  " स्वामी सर" हो तेच सर ज्यांच्यामुळे मी आज एवढ्या कविता लिहू शकलो.
            आज वर्गात पण सर कविताच शिकवणार होते , ते इतके तल्लीन होऊन शिकवत कि तास कधी संपला कळतंच नाही. असाच तोही तास संपला आणि सरांनी जाताना आम्हाला गृहपाठ दिला. हा आता गृहपाठ म्हणलं कि सगळ्यांनाच नकोस होतं पण मी विषय ऐकला अन एकदम आनंदूनच गेलो सरांनी सर्वाना सांगितलं होतं की उद्या येताना सर्वांनी 'झाड'
या विषयावर कविता लिहून आणायची.

         मग काय...? तो योग आलाच जेंव्हा माझी पहिली कविता लिहिण्याची वेळ होती. खूप मस्त वाटत होत. मी पूर्ण दिवस कवितेचाच विचार करत होतो,  काय लिहावं..? कसं लिहावं..? कळत मात्र काहीच नव्हतं.
        तरीही सरांचा आवडता विद्यार्थी असल्याने गृहपाठ पूर्ण करायचाच होता. मग कसाबसा लिहायला लागलो. कवितेचे थोडेफार नियम माहित होते सरांनी शिकवल्याप्रमाणे, मग कसाबसा यमक जुळवत करत होतो कविता.
शेवटी विषय सुचलाच.! मी असं लिहायच ठरवलं की एक झाड मला बोलत आहे आणि तो त्याचं दुःख मला सांगतोय, आणि मला झाडे वाचवली पाहिजेत असा संदेश सुद्धा माझ्या कवितेतून द्यायचा होता.

        मी माझं पहिलं कडवं लिहिलं..

"एकदिवस काय झालं
चमत्कारच घडला
एक झाड मला
चक्क बोलूच लागला..."

       चला हे तर झालं पण पुढे काय..? अजून विचारांचं मंथन सुरु झालं आणि मी विचार केला की झाड बोललं म्हणजे हे तर अनपेक्षितच होतं.. मग कोनाचीही जी प्रतिक्रिया असेल तीच माझीही झाली आणि मग मी पुढे लिहिलं..

"जेंव्हा मी भिऊन
 पळू लागलो लांब
तेंव्हा झाड म्हणाले मला
थांब जरा थांब..."

        अरे जमलं कि लिहायला. मला खूपच आनंद झाला होता मग झाड मला काय म्हणेल त्याच दुःख त्यानं  मला सांगितलं आणि यातून हेच मलाही कळलं होतं की झाडे तर वाचवायला हवीत आणि पुढे हाच संदेश लिहायचा विचार करून मी माझी पहिली कविता पूर्ण केली.
जवळ जवळ पन्नास वेळेस तरी ती मी ती कविता वाचली असेन आणि वाचून दाखवली असेल.माझं एक कविता लिहिण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं.

    (तर मित्रांनो वाचायचीय ना तुम्हाला पण ती कविता...? अरे हो पण अजून मी शाळेत जाऊन कविता सरांना दाखवली नाही ना..!! याच्या पुढच्या भागाची नक्की वाट पहा त्यात ती कविता मी शाळेत म्हणून दाखवणार आहे मग तुम्हीही ऐका...!!😊)

                                       To be continued....




6 comments:

Unknown said...

मस्त आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत तुझ्या कवितेची

Unknown said...

Ekadam kdk

Unknown said...

Bhai lvkr Tak

Unknown said...

Khup aturta ahe

dhanashri ingle said...

Well done Shubham

samarth dattatray kulkarni said...

We are eager...